Pages

Friday, 10 April 2015

बुद्धमय भारताची चळवळ हीच खरी आंबेडकरी चळवळ आहे

बुद्धमय भारताची चळवळ हीच खरी आंबेडकरी चळवळ आहे

            विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि , अस्पुश्योन्नतीचा उद्देश समाजक्रांती करण्याचा आहे , आणि समाजक्रांती करताना मला धर्मक्रांती जरी मला करावी लागली तरी मी करेन आणि पुढे बाबासाहेबांनी आपल्या असंख्य अनुयायांसह बुद्ध धम्मात प्रवेश करीत धम्मक्रांती केली ., पण धम्म बांधवानो हि क्रांती अधुरी आहे बुद्धमय भारत हा नंतरचा भाग आहे प्रथम आपल्याला बुद्ध धम्म हा हिंदू धर्मापासून वेगळा आहे हे सिद्धच करून नव्हे तर रुजुवून भारतीय समाजाला पटवून द्यावा लागेल, बौद्ध धम्म हि हिंदू धर्माची शाखा नाही , बौध्द धम्मियांची स्वतंत्र संस्कृती आहे ती समाजासमोर ठेवावी लागेल. स्वतंत्र बौद्ध कायदा लवकरात लवकर पारित करावयास हवा . बौद्धांच्या लग्न पद्धतीत सुसूत्रता नाही हि सुसूत्रता निर्माण करावी लागेल .
त्याशिवाय सावरकरांनी बाबासाहेबांचे धर्मांतर म्हणजे रिंगणात पडलेली उडी आहे हे आपण छातीठोकपणे खोटे सिद्ध करू शकत नाही .

               या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून निव्वळ राजकीय स्वरुपाची भूमिका जर आजचा बौद्ध तरुण घेत असेल तर तो सावरकरांनी जसा बाबासाहेबांच्या धर्मांतराचा अपमान केला तसा बौद्ध तरुणही बाबासाहेबांचा अपमान करताच आहे असे मला वाटते .

                    बाबासाहेबांची धम्मा क्रांती फसली कारण विदर्भात धम्मदीक्षेचा कार्यक्रम ठेवला तेथील स्वार्थसाधू लोक धम्माबाबाद उदासीन आहेत हे प्रत्यक्षात विदर्भवारी केल्यावर समजते (माझे यावर सविस्तर लेखन सुरु आहे ). काहींच्या मते बौद्ध होण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारणे गरजेचे नाही.म्हणे बुद्ध तत्व आत्मसात केले कि झाले सर्व! हा मूर्खपणाचा कळस नव्हे काय ? बाबासाहेबांच्या धर्मांतराचा सोहळा मग काय टाईमपास होता काय ?? कि हाउसमौज होती? (हा समज राजकीय मतंमतांतराचा परिणाम असेलही पण पूर्वीच्या नागवंशीयांनी , मध्यंतरीच्या महार आणि आताच्या बौद्धांनी हि भूमिका घेणे म्हणजे वैचारिक नपुंसक असणेच नव्हे का ? )

                  जर नुसत्या अनुसरनाने जर कोणी बौद्ध होत असता तर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म अनुसरा असे समाजास आवाहन केले असते तरी चालले असते ना? पण बाबासाहेबांनी दीक्षा ग्रहणाचा कार्यक्रम का ठेवला ?? कारण बाबासाहेब पक्के जाणून होते कि , फक्त दोघांनी नवरा बायको मानून उपयोग नसतो तर येथे त्यास समाजाची मान्यता मिळणे गरजेचे असते. समाजासमोर ते दोघे नवरा बायको आहेत हे समजण्यासाठी लग्न पद्धती रूढ आहे तिचा अवलंब करावा लागतो नाहीतर त्या दोघांत असलेले संबंधांना समाज अनैतिक संबंध म्हणून दूर ढकलतो. हीच जाणीव धम्मक्रांतीला गौण मानणाऱ्या मुर्खांनी ठेवायला नको काय ??

               बाबासाहेबांची बुद्धमय भारताची चळवळ हीच खरी आंबेडकरी चळवळ आहे ज्यात समता स्वातंत्र्य बंधुतेचा उदारतेने पुरस्कार केलेला आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक बौद्ध बांधवाने बुद्ध धम्म भारतभर तळागाळात कसा पोहचवता येयील याकडे लक्ष पुरवायला हवे.

जय भीम
नमो बुद्धाय

No comments:

Post a Comment