डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनपट:
  • १४ एप्रिल १८९१- महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत सुभेदार रामजी सपकाळ आणि भिमाबाई यांच्या पोटी जन्म.
  • १८९६-आई भिमाबाई यांचे निधन
  • १९००-नोव्हेंबर- प्राथमिक शाळा, सातारा मध्ये प्रवेश
  • १९०४- एलफिंस्टॉन हाईस्कूल, बॉम्बे प्रवेश
  • १९०६- रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.
  • १९०७- मॅट्रिकची परीक्षा पास.
  • १९०८-जानेवारी-केळुसकर गुरुजींनी गौतम बुध्द हे पुस्तक भेट दिलं.
  • १९१२- डिसेंबर-यशवंतचा जन्म
  • १९१३-बी.ए. परिक्षा उतीर्ण
  • १९१३-फेब्रुवरी- वडील सुभेदार रामजी यांची निधन
  • १९१३-जुन - सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.
  • १९१३- उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.
  • १९१५- ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.
  • १९१६- 'नॅशनल डिविडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिक अँन्ड अनलिकटिकल स्टडी' प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्विकृत.
  • १९१६- 'कास्ट इन इंडिया, देअर मॅकेनिझम जेनिसिस अँन्ड डेव्हलपमेँट' या निबंधाचे वाचन.
  • १९१६- पी. एच. डी. ची पदवी बहाल.
  • १९१७- मुंबई ला परत आले.
  • १९१८-नोव्हेँबर- सिडनहेम कॉलेजमध्ये अर्थशास्राची प्रोफेसर म्हणुण नियुक्ती.
  • १९२०-जानेवारी- राजर्षी शाहु महाराज यांच्या साहाय्याने मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  • १९२१- एम. एस. सी पदवी संपादन.
  • १९२२- बॅरिस्टरची परिक्षा पास.
  • १९२३- डॉ. ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली.
  • १९२३- डॉ. ऑफ सायन्सची पदवी बहाल.
  • १९२३- दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ प्रकाशित.
  • १९२३- बॅरिस्टरीस सुरुवात.
  • १९२४- अस्पृश्य समाजाची परिषद.
  • १९२४-जुलै- बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना, मुंबई.
  • १९२५- असृश्यांसाठी वसतीगृह स्थापन.
  • १९२६-जुलै- राजरत्न या मुलाचे निधन.
  • १९२७- कुलाबा जिल्हा महाड बहिष्कृत परिषद.
  • १९२७-एप्रिल - बहिष्कृत भारत या पाक्षिकाचे प्रकाशन.
  • १९२७- मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणुन निवड.
  • १९२७-सप्टेँबर- समाज समता संघ याची स्थापना.
  • १९२७- बंधु बाळाराम आंबेडकरांचे निधन.
  • १९२७- अस्पृश्य समाजातील शिक्षकांतर्फे सत्कार.
  • १९२७-नोव्हेँबर- अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्यागृह.
  • १९२७-डिसेँबर- महाडचा सत्यागृह, मनुस्मृती दहन.
  • १९२८- महार वतने सुधारणा विधेयक विधी मंडळासमोर मांडले.
  • १९२८- मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यपक.
  • १९२८- मुंबई प्रांतिक समितीवर निवड.
  • १९२८- सायमन कमिशन पुढे साक्ष.
  • १९२८-जुन - समता पाक्षिकाचा आरंभ.
  • १९२९- दामोदर सभागृहात गिरणी कामगारांच्या सभेत भाषण.
  • १९२९- टांग्यातुन फेकले गेल्यामुळे पायाला दुखापत.
  • १९२९- अस्पृश्यांसाठी33 टक्के आरक्षण देण्याबाबत मुंबई विधिमंडात भाषण.
  • १९३०-मार्च- काळाराम मंदिर नाशिक सत्यागृह प्रारंभ.
  • १९३०-नोव्हेँबर- गोलमेज परिक्षेत अस्पृश्यांची बाजु ठामपणे मांडली.
  • १९३०-नोव्हेँबर- जनता साप्ताहिकाचा आरंभ.
  • १९३१-नोव्हेँबर - गांधी व बाबासाहेब व पंचम जार्ज यांची भेट.
  • अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत गांधीजीच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.
  • १९३२- अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यासंबंधी परिषद.
  • १९३३- संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला प्रयान.
  • १९३५-मे - पत्नी रमाबाई यांचे निधन.
  • १९३५- मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती.
  • १९३५-ऑक्टोँबर- येवला. हिँदु म्हणुण जन्माला आलो, पण हिँदु म्हणुण मरणार नाही - डॉ. बाबासाहेब
  • आंबेडकरांची येवला येथे धर्माँतराची घोषणा.
  • १९३६-ऑगस्ट- स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना.
  • १९३६- जाती प्रथेचे उन्मुलन भाषन प्रकाशित.
  • १९३६- मुक्ती कोण येथे विख्यात भाषण.
  • १९३६- प्रकृती स्वास्थासाठी युरोपला रवाना.
  • कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बिल मांडले.
  • १९३७-फेब्रुवारी- मुंबई ऍसेँब्ली निवडणुक विजयी.
  • १९३८- पंढरपुर मातंग परिषदेतर्फे मानपत्र.
  • १९३८- मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
  • १९३८- विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा.
  • १९३८- औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.
  • १९३८- औरंगाबाद येथे अस्पृश्य सभेचे अध्यक्ष.
  • १९४०- मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत भेट.
  • १९४०- थॉटस अँन्ड पाकिस्तान या ग्रंथाचे प्रकाशन.
  • १९४२-जुलै- भारतीय दलित वर्ग परिषद, नागपुर येथे हजर.
  • १९४२- मजुर मंत्री म्हणुन निवड.
  • १९४२- अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनी स्थापना.
  • पुणे येथे रानडे जन्म शताब्धी कार्यक्रमात सर्वोतम भाषण.
  • १९४५- काँग्रेस आणि गांधीजीनी अस्पृश्यांप्रती काय केले ग्रंथ प्रकाशित.
  • १९४६- शुद्र पुर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित.
  • १९४६- सोलापुर, अहमदाबाद नगर पालिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणपत्रे दिली.
  • १९४६-जुन- मुंबई येथे सिध्दार्थ महाविद्यालची स्थापना.
  • १९४७- ऑगस्ट- भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणुण मंत्री मंडळात प्रवेश.
  • १९४७-ऑगस्ट-- संविधान समितीच्या अध्यक्ष पदावर निवड.
  • १९४८-ऑक्टोँबर- दि अनटचेबल्स ग्रंथ प्रकाशित.
  • १९४८-नोव्हेँबर- घटनेचा मसुदा घटना समितीवर ठेवला.
  • १९४९-नोव्हेँबर- घटना समितीने घटना स्विकार केली.
  • १९४९- घटना समितीत देश प्रेमाने ओथंबलेले समारोपीय भाषण.
  • १९५०- बुध्द आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य लेख प्रसिध्द, वरळी येथे बुध्द विहारात भाषण.
  • १९५०- कोलंबो विश्व बौध्द परिषदेला उपस्थिती.
  • १९५०- औरंगाबाद येथे मिलिँद महाविद्यालय स्थापन.
  • १९५१- लोक प्रतिनिधत्व विधेयक लोक सभे पुढे मांडले.
  • १९५१-सप्टेँबर- हिँदु स्रीयांची उन्नती आणि अवनती हा लेख महाबोधी मासिका मध्ये प्रकाशित.
  • १९५१-सप्टेँबर- हिँदु कोड बिल व मागास वर्गीयांच्या आरक्षणाबाबत मंत्री परिषदेचा राजीनामा.
  • १९५२-मार्च- राज्य सभेसाठी निवड.
  • १९५२- प्रथमच सार्वत्रिक निवडनुकीमध्ये बाबासाहेबांचा पराभव.
  • १९५२-जुन- कोलंबिया विद्यापिठातर्फे डॉ. ऑफ लॉ हि पदवी अर्पन.
  • १९५२- शिवाजी पार्कवर प्रचंड जाहीर सभेत ह्रदयस्पश्री भाषण.
  • १९५२- एलफिन्स्टन महाविद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलनात उत्कृष्ठ भाषण.
  • १९५४- वर्गीकृत जाती जमाती आयुक्त यांच्या प्रवृत्तीवर भाषण.
  • १९५४-ऑक्टोँबर-- आकाशवाणीवर माझे वैयक्तीक तत्वग्यान हे भाषण.
  • १९५४-ऑक्टोबर- माझे आयुष्य तीन गुरुंमूळे घडले.
  • १९५४- राज्यसभेत परराष्ट्रीय धोरणावर भाषण.
  • १९५४- -महत्मा फुले बोलपट चित्रपटाच्या मुहुर्त सभारंभात उपस्थित.
  • १९५४-  भंडारा पोट निवडणुकीमध्ये पराभव.
  • १९५४-  रुपये1, 18, 000 /- ची थेली मुंबई शहर दलित फेडरेशने चळवळीसाठी दिली.
  • १९५४- रंगुन तिसय्रा जागतिक बौध्द परिषदेला उपस्थित.
  • १९५५- भारतीय बौध्द महासभा स्थापित.
  • १९५६-फेब्रुवारी-- मुंबई हि महाराष्ट्राचीच असावी असे भारत सरकारला सुनावले.
  • १९५६-मे-- नरेपार्क येथे ऑक्टोँबर महिन्यात मी बौध्द धम्माची दिक्षा घेईल अशी घोषणा.
  • १९५६-ऑक्टोँबर-- नागपुर येथे पुज्य भंते महास्थवीर चंद्रमणी यांचेहस्ते पत्नीसोबत धम्म दिक्षा घेतली. व
  • नंतर आपल्या पाच लाख अस्पृश्यबंधुना बौध्द धम्माची दिक्षा दिली.
  • १९५६-ऑक्टोँबर- बौध्द धम्म का स्विकारला या विषयी सकाळी अदभुत पुर्व भाषण व नंतर नागपुर
  • मुन्सीपार्टीतर्फे संध्याकाळी मानपत्र अर्पन.
  • १९५६-ऑक्टोँबर- चंद्रपुर येथे 2 लाख अस्पृश्य बंधुना धम्म दिक्षा दिली.
  • १९५६-नोव्हेँबर- काठमांडु नेपाल येथे जागतिक बौध्द परिषद, बौध्द आणि कार्लमार्क्स हे अदभुतपुर्व भाषण दिले.
  • १९५६-डिसेँबर,६-  दिल्ली येथे त्यांच्या निवास्थानी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.
  • १९५६- डिसेँबर,७- मुंबई दादर येथे चौपटीच्या किनाय्रावर 10 लाख अनुयायीँच्या साक्षीने बौध्द पध्दती नुसार अंतिम संस्कार करण्यात आले.